शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना??

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता.

तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे?

त्याने हसून उत्तर दिले,“ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.”

मी म्हणालो,”खरंच..!”

म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही.

“निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं.

मी निराश का होईन..!अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.

माझा संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर पूर्ण विश्वास आहे,आम्ही नक्कीच जिंकू.

खरोखरीच तसेच झाले,खेळ त्या मुलाच्या संघाने ५-४ च्या आघाडीने जिंकला.

त्याने एका स्मित हास्यासह सावकाश माझ्याकडे बघून हात हलवला आणि तो निघून गेला.

मी आश्चर्याने,आ वासून बघतच राहिलो,
असा आत्मविश्वास…
इतका ठाम विश्वास..!

त्या रात्री मी घरी परत आल्यावरही,त्याचा प्रश्न माझ्या मनात घुमत होता;
मी निराश का होईन?अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.

आयुष्य हे सुद्धा एका खेळासारखे आहे, शेवट पर्यंत धैर्याने सामोरे जा…

जीवन अजून संपलेलं नसतांना निराश का व्हायचं?
शेवटची शिट्टी वाजत नाही,तोपर्यंत आशा का सोडायची.

खरी गोष्ट अशी की बरेच लोक खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी स्वतःच वाजवतात.

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काहीही अशक्य नाही,आणि तुमच्यासाठी कधीही फार उशीर झालेला नसतो.

अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते.

स्वतःच शिट्टी वाजवून खेळ समाप्त करू नका.धीर सोडू नका. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. Do ur Best. U can
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top