शिव पूजेतील वर्ज गोष्टी

शिव पूजेतील वर्ज गोष्टी

🚩 भगवान शिव हे आदि आणि अनंत आहेत, जे संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणात वसलेले आहेत.

🚩 भोलेनाथ आपल्या सद्भक्तांवर नेहमीच प्रसन्न असतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा शीघ्रतेने पूर्ण करतात.

🚩 भगवान शिव जलाभिषेकाने प्रसन्न होतात, परंतु शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे भोलेनाथ लवकरच क्रोधित होतात.

🚩 या गोष्टी इतर देव -देवतांच्या पूजेत वापरल्या जातात. पण भोलेनाथच्या पूजेत त्यांचा वापर वर्ज आहेत.

🚩 शिवपूजेमध्ये या गोष्टींचा वापर केल्याने, व्यक्ती पुण्याच्या ऐवजी पापाचा भागीदार बनतो आणि भगवान शंकराचा क्रोध सहन करावा लागू शकतो.

🔱 १. घरात दोन शिवलिंगांची स्थापना करू नये. असे केल्याने घरात दारिद्र्य आणि दुर्भाग्य येते. यामुळे घरातील सर्व सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

🔱 २. भोलेनाथला नेहमी पितळ, कांस्य किंवा अष्टधातूची भांडी किंवा लोटा यांतून पाणी अर्पण करावे, लोखंड किंवा स्टीलची भांडी नव्हे.

🔱 ३. सर्व देवकार्यात तुळशीचा वापर केला जातो, परंतु भोलेनाथवर तुळशी अर्पण करणे वर्जित आहे. काही लोक अज्ञानामुळे ते शिवपूजेमध्ये तुळशीचा वापर करतात. ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होत नाही.

🔱 ४. शिव पूजेमध्ये बेलाच्या पानांचे विशेष महत्व आहे. तूटलेली , फाटलेली बिल्वदले भगवान शिव यांना अर्पण करू नये. असे केल्याने उपासनेचा विपरीत परिणाम प्राप्त होतो. जेव्हा जेव्हा बिल्वाची पाने भगवान शिव यांना अर्पण केली जातात, तेव्हा ती नीट तपासून पाहिल्यानंतर आणि धुल्यानंतर त्यांचा वापर करावा. जेणेकरून भोलेनाथांचे आशीर्वाद कायम राहील.

🔱 ५. देवपूजेच्या सर्व विधींमध्ये शंख वापरला जातो, परंतु शिवलिंगावर शंखाने पाणी अर्पण करू नये. शिव पुराणानुसार भगवान शिवाने शंखचूर या राक्षसाचा वध केला होता. म्हणून शंकराला शंख हा पूजेमध्ये निषिद्ध आहे.

🔱 ६. कुमकुम / कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे, तर भगवान शिव हे वैरागी आहेत, त्यामुळे शिवाला कुंकू वाहत नाहीत.

🔱 ७. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे, आणि महिला सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो. म्हणून भगवान शिव यांना हळदी अर्पण केली जात नाही.

🔱 ८. भोलेनाथला लाल फुले अर्पण केली जात नाहीत. याशिवाय केतकी आणि केवडा फुले अर्पण करण्यासही मनाई आहे. भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण केल्याने ते लवकरच प्रसन्न होतात.

🔱 ९. खंडित झालेल्या / तुटलेल्या अक्षदा भगवान शिव यांना अर्पण करू नयेत. खंडित / तुटलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध आहे म्हणून भोलेनाथला अर्पण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top